Friday, 2 December 2016

#शुभ_सांज...!
निसर्गाची विविध रूपं हि आपल्या समोर हात जोडून उभी असतात.त्याचा तशाच रसिक दृष्टीने मागोवा घेतल्यास मौल्यवान शिकवणसुद्धा देतात.
निसर्ग हे बदलाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल.इतका बदल अपेक्षित ठेवूनच निसर्गाचे चक्र अव्याहतपणे सुरु असते.
बदल स्वीकारले तरी निसर्गाचा मूळ बाज बदलत नाही.सूर्यास्ताच्या वेळची रंगांची उधळण हि काही बदलत नाही..!
तशाच प्रकारे माणसांनी सुद्धा बदल स्वीकारत मार्गाक्रमण केल्यास जीवनाचा आनंद लुटता येईल...पण हो माणुसकीचा अमूल्य धागा निरंतर ठेवूनच हा बदल आनंदाने स्विकारुया..!
नोटा बदलल्या आपणही तो सकारात्मक पद्धतीने स्वीकारु... त्याला सामोरे जाऊ या....परस्परातील राष्ट्रीयत्वाचा धागा अखंड ठेवूनच....!
सूर्याचा अस्त जरी होत असला तरी रंगांची आकर्षक उधळण आपल्याला जीवनाच्या आनंदी रंगाची जाणीव करुन देतोय...!
मग बदलूया ना....नोटा आणि दृष्टी...आनंदाने राष्ट्रीयत्वाची ज्योत जागी ठेवत...!
सर्व स्नेही जणांना शुभ सांज...शुभ संध्या...!
जयहिंद
वंदे मातरम..!
(माळापुडे येथील शाळा परिसरातून घेतलेले सायंकाळचे सूर्यास्त क्लीक...motoG2)
✒श्री विशाल आनंदराव हारगुले.
दि.१८/११/२०१६

No comments:

Post a Comment